Monday, 19 February 2018

*शिवजयंती महाराणा प्रतापांच्या मेवाड भूमीत*

*शिवजयंती महाराणा प्रतापांच्या मेवाड भूमीत*

हिंदवी स्वराज्य संस्थापक,रयतेच्या राजांस विनम्र अभिवादन,जय शिवाजी,जय भवानी

राजे अनेक झाले पण रयतेच्या सुखासाठी झटणारे काही मोजकेच राजे झाले,त्यातही परकीयांची गुलामी झुगा
रून रयतेच्या स्वराज्यासाठी बलशाली परकीय सत्ताधिशांसोबत लढण्याचे सामर्थ्य दाखवणारे व मावळ्यांच्यात स्वराज्याची भावना निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापणा करणारे, मराठी माणसाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष,शिवाजी महाराजांची जयंती स्वराज्यासाठी लढणारे दुसरे राजे महाराणा प्रतापांच्या मेवाड राज्याची राजधानी उदयपूर (राजस्थान) येथे सर्व भारतातून CCRT प्रशिक्षणास आलेल्या देशभरातील शिक्षकांनी उत्साहात साजरी करून Our Cultural Diversity या प्रशिक्षणाच्या विषयाची पहिल्या दिवशीच सुरवात महाराजांच्या जयजयकारांच्या घोषणांनी झाली.त्याचा भाग असणे हा एक आम्हासर्वासाठी अविस्मरणीय क्षण.

छत्रपतींचे नाव घेतले की देशभरातील लोकांच्या डोळ्यात एक आदरयुक्त भाव दिसतो, आज उदयपूर मध्ये छत्रपतींच्या जयजयकारांच्या घोषणा देताना अभिमान तर होताच पण मराठी भूमीत शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला येणे हे भाग्य लाभल्याची जाणीव होते.

गेली चार दिवस राजस्थान मधील जयपूर, अजमेर,पुष्कर,जोधपूर पहाताना येथील शिवकालीन राजे जयपूरचे मिर्झा राजे जयसिंग,जोधपूरचे जसवन्तसिंह राठोड यांचे राजवाडे,किल्ले आजही अत्यन्त दिमाखात उभे आहेत.तेथे कुठेच मोडतोड झाली नाही.त्या राजांचे वैभव आजही जाणवते.खूपच चैन विलासात या राजांनी आपले जीवन जगल्याची अनेक प्रतीके येथे दिसतात.अन मनात एक प्रश्न पडला शिवकालीन हे सर्व राजे पण यांच्या सर्व बाबी अत्यन्त सुस्थितीत पण महाराष्ट्रातील किल्ले गड तितके सुस्थितीत नाहीत त्यांची पडझड इतकी कशी झाली? राजानी आपले वैभव स्वतःचे गड,राजमाल यांच्या भव्यतेला मानले नाही तर येथील रयतेच्या झोपडीत आंनदाची लकेर निर्माण होऊन समतेने जगता यावे यासाठी अखंड आयुष्य सन्ह्याद्रीच्या कड्यापकारीत जुलमी राजवटी सोबत  संघर्ष करण्यात वेचले.या संघर्षात मुघल व परकीयांनी वेळोवेळी लोककल्याणकारी स्वराज्यात हैदोस करत येथील गड,किल्ले,मंदिरे यांची मोडतोड केली.पण जयपूर व जोधपूरचे राजे पराक्रमी व वैभव संपन्न होते पण ते मुघलांच्या आधीन झाले व त्यांनी आपल्या दौलती वाचवल्या.मिर्जा राजे जयसिंग तर औरंगजेबचा सेनापती व जोधपूरचे जसवन्तसिंह राठोड सरदार होते.आग्रा भेटीत जसवन्तसिंह राजांच्या पुढल्या रांगेत का होता?याचे कारण पराक्रम नव्हता तर त्यांची मुघलांसोबत असणारी वफादारी..पण जेव्हा हाल्दीघाटी व चित्तोडगड मध्ये गेलो त्यावेळी तेथील अनेक बाबी भग्न स्वरूपात जाणवल्या अन जे राजे परकीयांच्या अंकित झाले नाहीत व रयतेच्या भल्यासाठी उभे राहिले त्यांच्या राज्यातील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड संघर्षात झाली.चित्तोडगड हा अशाच स्वाभिमानी संघर्षाची प्रचिती देणारा गड,राणी पद्मिनी सोबत हजारो स्त्रियांनी केलेला जोहर असो की महाराणा प्रताप ज्यांनी 21 वर्षे कोणताही थाटमाट न करता पानावर भोजन घेतले व जमिनीवर विश्रांती घेतली,आयुष्यभर मुघलांसोबत गनिमी काव्याने संघर्ष केला.दुर्दैव हेच की एकीकडे महाराणा प्रताप स्वराज्य स्वाभिमानासाठी लढत असताना इतर राजे मात्र मुघलांना सामील होऊन स्वतः ऐशोअरामात राहिले. *जोधपूर,जयपूर पहाताना स्थापत्य कला,महालांची भव्यता आवडली पण इतिहास ऐकताना रयतेसाठी संघर्ष जाणवत नव्हता पण हाल्दीघाटी, चित्तोडगड पहाताना तेथील राजांचा पराक्रम,शौर्य स्वातंत्र्यप्रियता प्रेरणा देणारे होते.छत्रपती शिवाजी महाराजानी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य व मेवाडचे राज्य यांच्यात साम्य जाणवले,आज याच मेवाड मध्ये छत्रपतींची जयंती सर्वानी मोठ्या उत्साहाने साजरी केली.*

*यावेळी सांगलीतून उपक्रमशील शिक्षक राजकुमार भोसले, मिलन नागणे,रमेश मगदूम,अनिल मोहिते व आकाश जाधव यांच्या सोबतीने इतिहासाच्या पाउलखुणा पाहत आपली सांस्कृतिक विविधता या विषयाचे देशभरातील शिक्षकांसोबतच्या प्रशिक्षणाची सुरवात उत्साहात झाली...*

CCRT प्रशिक्षणाच्या निमित्ताने देशभरातील शिक्षकांशी हितगुज करण्याची व त्यांच्या शिक्षण पद्धती,कला,संस्कृती यांची माहिती जाणून घेता येणार आहे.

✒✒ *अमोल शिंदे* ✒✒
*जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग,ता.मिरज जि. सांगली*

9420453475

No comments:

Post a Comment

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...