Thursday, 22 February 2018

*महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात?पण राजस्थानातील नाही???

*महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात?पण राजस्थानातील नाही???
*मार्बलच्या कारखान्यास भेटीतुन जाणवलेली राजस्थानी माणसाची सकारात्मकता...*

राजस्थानातील उद्योगप्रिय लोकांनी पाणी नाही,वाळवंट आहे,कसदार जमिनी नाहीत म्हणून नकारात्मक विचार करत आपल्या न्यूनतेला मोठे करत बसण्यापेक्षा आपल्या जमेच्या बाजूना सक्षम करत जीवनमान उंचावल्याचे लक्षात येते. ज्या मारवाडात वाळवंट आहे तेथील मारवाडी लोक आज देशभरात उद्योग व्यवसायात आघाडीत असून अत्यन्त विपरीत परिस्थिती असतानाही आर्थिक दृष्ट्या सक्षम असून अत्यन्त विश्वासाहार्य व्यावसायिक लोक म्हणून आपली ओळख निर्माण केली.आज आईस्क्रीम असो की हार्डवेअर दुकान,कलाकुसर या सर्व बाबतीत या लोकांनी मिळवलेल्या व्यावसायिक प्राविण्यातून बाजारपेठ आत्मसात केली.आज शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात पण राजस्थानात इतकी विपरीत परिस्थिती असताना शेतकरी आत्महत्या झाल्याच दिसत नाही.

राजस्थान म्हणजे वाळवंट.एवढेच मनावर बिंबले होते.पण एका बाजूला वाळवंट अन दुसरीकडे अत्यन्त आकर्षक दगडांचे डोंगर ही आहेत.जोधपूर मधील जोधपूरी दगड अत्यन्त आकर्षक असून सर्व महाल व घरे याच दगडाने बांधली आहेत.या दगडांची घडवणं अत्यन्त सुरेख असून घराला ही महाल बनवणारा दगड तेथील डोंगरात मुबलक मिळतो.

आपल्याकडे मार्बल पाहिल्यावर तो दगड कुठे असेल व त्यापासून फरशी कशी बनवतात असे वाटायचे.अन आपल्या कडील कठीण काळा दगड पाहिल्यावर जमिनीतून इतका पांढरा शुभ्र दगड निघत असेल??असा प्रश्न पडायचा.राजसमंद जिल्ह्यात मार्बल चे डोंगर आहेत.जोधपूर हुन नाथद्वारा कडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा मार्बलचे कारखाने दिसले.एका कारखान्याला भेट देऊन तेथील माहिती घेतली. तेथे जवळच्या डोंगरातून कापून आणलेले मोठे आयताकृती दगड कटिंग करून त्यापासून विविध आकारात फरशी बनवण्यासाठी दगड मशिनला लावले होते.एका मशीनवर दिवसात दोन दगड कटिंग होतात असे मॅनेजरनी सांगितले.ऑस्ट्रेलिया मधूनही तेथील दगड येथे आला होता व त्याचे कटिंग ही सुरू होते.फक्त आपल्या स्थानिक डोंगरात मिळतो तेच मार्बल तयार करून न पाठवता परदेशातून ही दगड आणून ते मार्बल ही उपलब्ध करणे हे या लोकांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाची जाणीव करून देते.खाणीत दगड काढणारे,ते कटिंग करणारे,गाड्याभरणारे,त्या गाड्या रिकाम्या करणारे तसेच महाराष्ट्रात हे मार्बल विकणारे दुकानदार अन घरात हे मार्बल बसवनारे गंवडी ही राजस्थानी लोकच बहुसंख्येने आढळतात.आपल्याकडील हार्डवेअर दुकाने पाहिली तरी लक्षात येईल मोठी उलाढाल असणाऱ्या राजस्थानी व्यक्तीच्या दुकानात फक्त 2 ते 3 लोक काम करतात.ते राजस्थानी असतात.जेव्हा एखादी गाडी भरायची असते व कामगार कमी असतो त्यावेळी कामगारांची वाट न पाहता स्वतः लोखंडी अँगल उचलून दुकानाचे मालक गाडीत भरतात.पण आपण आपण मालक झालोत की मी फक्त खुर्चीवर बसणार इतर कामे कामगारांनी करायची ही मानसिकता बऱ्याच लोकांत दिसते पण राजस्थानी लोक याबाबतीत अपवाद दिसतात.

*उत्पादन ते होलसेल,रिटेल विक्री अशी या लोकांनी निर्माण केलेली साखळी खूपच मार्गदर्षक आहे.सध्या भारतात उपभोग वृत्ती वाढलेली आहे.भारतात सेवा क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असताना आपल्या बाजारपेठेचा वापर चीन सारखे देश करत आहेत.भारत हा युवकांचा देश,हे युवक निर्माते बनले तर भारत जगात आघाडीवर असेल पण हे युवक फक्त ग्राहक व नोकरदार बनणे नक्कीच देशाला पिछाडीवर नेणारे होईल.राजस्थानी लोकांनी निर्माण केलेली साखळी सर्वत्र निर्माण झाली



तर नक्कीच नोकरी पेक्षा व्यवसाय,उद्योगात आपण पुढे जाऊ.महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड कष्टाळू आहेत.काळ्या मातीतून ते सोने पिकवतात पण पिकवल्यांनंतर पुढे ते विकण्याची शेतकऱ्याची स्वतःची साखळी मात्र दुर्दैवाने निर्माण करण्यात अपयश आले किंवा ती बनवण्याकडे महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी तितके लक्ष दिले नाही.सहकारातून काही अंशी तो प्रयत्न झाला पण सहकारावर वैयक्तिक प्रभुत्व निर्माण करत स्वतःची जहागिरी निर्माण करण्याच्या हव्यासात शेतकऱ्याचा बळी गेला.अन आज शेतकरी आत्महत्येमागे सर्वात मोठे कारण उत्पादन कमी हे नाही तर आलेल्या उत्पादनास, उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव न मिळणे हे असून जर राजस्थान प्रमाणे उत्पादन ते विक्री ही साखळी निर्माण झाल्यास ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी संपन्न व स्वयंभू होईल.पण हे व्हावे अशी प्रबळ इच्छा राज्यकर्त्यांची आहे का???*

अमोल शिंदे
amol.mallewadi@gmail.com
9420453475
http://amolshindemrjphs.blogspot.in/?m=1

No comments:

Post a Comment

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...