अति आत्मविश्वास ...
आज लागलेल्या उत्तर प्रदेश मधील पोट निवडणुकीच्या निकलानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अति आत्मविश्वासामुळे पराभव झाल्याचे मान्य केले.स्वतः योगीजी गेली 27 वर्षे ज्या मतदारसंघातून खासदार आहेत त्याच मतदार संघात स्वतः ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या उमेदवाराचा पराभव होणे हा उत्तर प्रदेश च्या जनतेने भारतीय जनतेला कोणत्याही पार्टीने गृहीत धरू नये असाच इशारा देणारा मानावा लागेल*. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तेथून सलग पाच वेळा लोकसभेमध्ये निवडून आले होते. तर फुलपूर मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य निवडून आले होते. या दोन्ही जागा आजच्या पोटनिवडणुकीत देशात व राज्यात एकहाती सत्ता असतानाही गमावणे नक्कीच विचार करायला लावणारे....
यातून राजकीय संदर्भ अथवा इतर बाबीत न जाता प्रत्येकाला पाय जमिनीवर हवेत असा संदेश मिळतो.मग अगदी आपल्या विविध संघटना अथवा नेत्यांनीही मी म्हणजे सर्व काही किंवा आमची सत्ता म्हणजे आम्हाला सर्व मान्यता असून हम करेसो कायदा ही ताठर भूमिका सर्वकाळ टिकत नाही. जनतेमध्ये झिरोला हिरो व हिरोला झिरो करण्याची ताकत आहे व योग्य वेळी भारतीय जनता ती वापरतेच...
#भारतीय जनताच नेहमी विजयी होते.
No comments:
Post a Comment