Tuesday, 16 January 2018

स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे यावरून काहि ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावेत?

*स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे यावरून काहि ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावेत??*

स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण म्हणजे आंनदाचे दिवस. एकता, समानता,स्वातंत्र्य,बंधुता,मानवता मनामनात रुजवणारे दिवस.पारतंत्र्यातील काळी राजवट अन त्याविरुद्ध  आवाज उठवत स्वातंत्र्यसूर्य उगवण्याकरीता बलिदान देणारे राष्ट्रीय नेते,क्रांतीकारक यांच्या कार्याचे स्मरण करत.उज्वल भारतासाठी आपला खारीचा वाटा उचलण्यास प्रेरित करत,मनामनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणारे सण.ते निखळ आंनदाने एकात्म भावाने आपण साजरे करतो.

नुकताच संघटनेच्या वतीने सीईओ साहेबाना भेटायला जाणार होतो अन एका शिक्षक मित्राचा फोन आला अन त्याने विचारलेल्या प्रश्नाने अंतर्मुख व्हायला लावले.तो प्रश्न होता.स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी शाळेमधील ध्वजारोहन कोणी करावे??स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे हा प्रश्न निर्माण व्हावा??त्याला काय असत गावातल्या स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी यांच्यापैकी कोणाच्या तरी हस्ते करायचं असे सांगितल्यावर ते मित्र म्हणाले नाही सर गावात निवडणुका झाल्या आहेत अन नियमाने ध्वजारोहण  कोण करायचे ते सांगा??मी निरुत्तर झालो.कारण असा काही नियम आज पर्यंत आम्ही लावला नव्हता व तसा विचार ही केला नव्हता.सिईओ साहेबाना नेमकी मुख्याध्यापकाची अडचण सांगितली व शासनाकडून त्याबाबत मार्गदर्शन मागवण्याची विंनती केली.भविष्यात ते येईल ही पण देशप्रेमापेक्षा राजकीय अभिनिवेश महत्वाचे ठरुन निर्माण होणारे असे प्रश्न नकीच अंतर्मुख करायला लावणारे आहेत.भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत असे रोज प्रतिज्ञेत जोर जोराने म्हणून ही तिची रुजवणूक मात्र झाली काय?अन झाली तर हा प्रश्न निर्माण झाला नसता..

खरेतर असा प्रश्न निर्माण व्हायला नाही पाहिजे पण बदलत्या काळात निर्माण झालेला असा हा प्रश्न.बहुसंख्य ठिकाणी हा प्रश्न निर्माण होत नाही.गावातील स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी यांच्यापैकी कोणाच्या तरी हस्ते ध्वजारोहण केले जाते.पण काही ठिकाणी मात्र ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे यासाठी चढाओढ होते अन कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला जात सदर शाळेतील शिक्षकांची ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करायचे या प्रश्नाचे उत्तर देताना गोंधळाची स्थिती होत निष्कारण मानसिक त्रासास व रुसव्या फुगव्याना सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार काही ठिकाणी होतात.हे वास्तव आहे.खरेतर याबाबत स्पष्ट असे आदेश नाहीत.पण एकंदर बदलत असलेली परिस्थिती,समाजमनाचा विचार करत शाळेतील ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे याबाबत काही मार्गदर्शक सूचना निर्गमित होणे शाळेतील मुख्याध्यापकांच्या दृष्टीने गरजेचे आहे.पण हा प्रश्न निर्माण होऊ नये अन लोकशाहीतील या पवित्र सणाच्या दिवशी आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी आपण सर्वजण भारतीय या एका सूत्रात बांधले गेलो पाहिजे.भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत असे प्रार्थनेत म्हणतो.मग राष्ट्रध्वज फडकवणारा भारतीय आहे,तो माझा बांधव आहे एवढी बाब मनात रुजवली तर ध्वजारोहण कोणी करावे??हा प्रश्न निर्माण होणार नाही.अनेक क्रांतिकारकानी रक्ताचे पाट वाहिले,आजही सीमेवर लाखो जवान आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी सीमेवर लढत आहेत.खडा पहारा देत आहेत.या सर्वांना वंदन करताना आपण आपली ओळख विसरून भारतीय म्हणूनच या राष्ट्रीय सणात सामील झालो तर आनन्द द्विगुणित होईलच पण ऐक्याची भावना वृद्धिंगत होत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण निखळ आंनदाने एकात्म भावाने साजरे होतील...

अमोल शिंदे


1 comment:

  1. या प्रश्नाचे उत्तर भेटले का। भेटले असेल तर काय आहे।

    ReplyDelete

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...