*नुसतं गोड बोलून चालणार काय??*
*फक्त गोड
नाही तर ज्या बोलण्यातून गोड परिणाम होईल असे गोड बोलूया*
*सर्वोच न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन व्यवस्था सदृढ करण्यासाठी मौन सोडले आता किरकोळ बाबीत मौन पाळायचे काय..??*
*आज संक्रात आपण एकमेकाला तिळगुळ घ्या गोड बोला अशा शुभेच्छा देतो. अलीकडे बदलत्या जगात बदलती मानसिकता पाहिली तर आपण गोड नेहमी बोलतोच.अनेकदा तर एखादा चुकीचे वागत आहे हे दिसत असूनही जाऊदे आपल्याला काय करायचे आपल्याला काय फरक पडतो का?मग कशाला वाईटपणा?असा विचार करून आपण सदर विघातक बाबी कडे दुर्लक्ष करून वैयक्तिक हित संबंध जपण्यात धन्यता मानतो.पण वेळीच समाजातील अपप्रवृत्ती बद्दल बोलायला हवे.नुसतं कोणाला वाईट वाटू नये म्हणून,दुसऱ्याला बर वाटावे म्हणून गोड बोलायला नको.तर खरं अन समाज हितासाठी प्रसंगी
कटू बोलावे लागले तरी बोलू,कारण औषध कडू असते पण परिणाम चांगला,काहीवेळेला वर्तमानात कटू वाटणारे शब्द पुढे अनेक समस्याना बांध घालतात अन ते भविष्यात गोड ठरतात.नुकतेच सर्वोच न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या तो प्रयत्न असाच औषधरुपी ठरावा.*
*प्रत्येकजण स्वतःच्या नजरेतून याबाबीकडे पहातोय पण सर्वोच न्यायालयाचे चार ज्येष्ठ न्यायाधीश एकत्र येत जर आपल्या व्यथा मांडत असतील तर याबाबीकडे अत्यन्त गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबीकडे राजकीय अभिनिवेशातून न पहाता लोकशाहीला मजबूत करणारे पाऊल म्हणून पाहिले पाहिजे.जे चार न्यायाधीश समोर येऊन बोलले त्यातील एकजण येत्या ऑक्टोबर मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत.असे असताना पदापेक्षा कर्तव्याला महत्व देत आपले कर्तव्य बजावण्यात जे अडथळे आहेत ते मांडणे नक्कीच शासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे असे पाऊल आहे.अनेकदा आपले कर्तव्य बजावताना आपणास ज्या अडचणी येतात त्या सांगणे म्हणजे बंडखोरी किंवा विरोध म्हणून पाहिले जाते.त्यामुळे कळत असूनही अनेकजण गप्प रहातात.*
*पेन्शन बंद करून लाखो कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर शासनाने संक्रात आणली.आता सरकारी शाळा बंद करून गोरगरिबांच्या शिक्षणावर संक्रात आणली जात असताना,
तिळगुळ खाऊन नुसतं गोड न बोलता या तीळगुळातील ऊर्जा आपल्या सर्वांच्या मनामनात संचारो.चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचे सामर्थ्य सर्वाना मिळो.सामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी कंपनीच्या शाळा नव्हे तर सरकारी शाळा समृद्ध करण्याचा अट्टहास करूया.शिक्षक संघटना आपसी राजकारण व अर्थकारण यातून वर येत शिक्षणाविषयी मंथन करत धोरणात्मक बाबीवर सडेतोड एकमुखी भूमिका घेतील अन सरकारी शाळा समृद्ध व्हाव्यात यासाठी प्रसंगी कटू पण सत्य मांडतील.सर्वाना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा व 23/10 लवकर रद्द व्हावा.यासाठी नुसते पत्रकावर विषय न घेता ते विषय तडीस लावन्यासाठी झटतील.आपला प्रश्न असेल तरच आंदोलनाला हजर,संघटनांच्या नेत्यांना फोन पण धोरणात्मक बाबीवर व शिक्षणाच्या मुद्यावर आपलं मौन सोडत.खऱ्या अर्थाने या संक्रातीच्या निमित्ताने फक्त गोड बोलून नाही तर ज्या बोलण्यातून गोड परिणाम होईल असे गोड बोलावे ह्याच माझ्याकडून व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली टीम कडून शुभेच्छा..तिळगुळ घ्या गोड बोला....*
आपला
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली*
9420453475
*फक्त गोड
नाही तर ज्या बोलण्यातून गोड परिणाम होईल असे गोड बोलूया*
*सर्वोच न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन व्यवस्था सदृढ करण्यासाठी मौन सोडले आता किरकोळ बाबीत मौन पाळायचे काय..??*
*आज संक्रात आपण एकमेकाला तिळगुळ घ्या गोड बोला अशा शुभेच्छा देतो. अलीकडे बदलत्या जगात बदलती मानसिकता पाहिली तर आपण गोड नेहमी बोलतोच.अनेकदा तर एखादा चुकीचे वागत आहे हे दिसत असूनही जाऊदे आपल्याला काय करायचे आपल्याला काय फरक पडतो का?मग कशाला वाईटपणा?असा विचार करून आपण सदर विघातक बाबी कडे दुर्लक्ष करून वैयक्तिक हित संबंध जपण्यात धन्यता मानतो.पण वेळीच समाजातील अपप्रवृत्ती बद्दल बोलायला हवे.नुसतं कोणाला वाईट वाटू नये म्हणून,दुसऱ्याला बर वाटावे म्हणून गोड बोलायला नको.तर खरं अन समाज हितासाठी प्रसंगी
कटू बोलावे लागले तरी बोलू,कारण औषध कडू असते पण परिणाम चांगला,काहीवेळेला वर्तमानात कटू वाटणारे शब्द पुढे अनेक समस्याना बांध घालतात अन ते भविष्यात गोड ठरतात.नुकतेच सर्वोच न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या तो प्रयत्न असाच औषधरुपी ठरावा.*
*प्रत्येकजण स्वतःच्या नजरेतून याबाबीकडे पहातोय पण सर्वोच न्यायालयाचे चार ज्येष्ठ न्यायाधीश एकत्र येत जर आपल्या व्यथा मांडत असतील तर याबाबीकडे अत्यन्त गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबीकडे राजकीय अभिनिवेशातून न पहाता लोकशाहीला मजबूत करणारे पाऊल म्हणून पाहिले पाहिजे.जे चार न्यायाधीश समोर येऊन बोलले त्यातील एकजण येत्या ऑक्टोबर मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत.असे असताना पदापेक्षा कर्तव्याला महत्व देत आपले कर्तव्य बजावण्यात जे अडथळे आहेत ते मांडणे नक्कीच शासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे असे पाऊल आहे.अनेकदा आपले कर्तव्य बजावताना आपणास ज्या अडचणी येतात त्या सांगणे म्हणजे बंडखोरी किंवा विरोध म्हणून पाहिले जाते.त्यामुळे कळत असूनही अनेकजण गप्प रहातात.*
*पेन्शन बंद करून लाखो कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर शासनाने संक्रात आणली.आता सरकारी शाळा बंद करून गोरगरिबांच्या शिक्षणावर संक्रात आणली जात असताना,
तिळगुळ खाऊन नुसतं गोड न बोलता या तीळगुळातील ऊर्जा आपल्या सर्वांच्या मनामनात संचारो.चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचे सामर्थ्य सर्वाना मिळो.सामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी कंपनीच्या शाळा नव्हे तर सरकारी शाळा समृद्ध करण्याचा अट्टहास करूया.शिक्षक संघटना आपसी राजकारण व अर्थकारण यातून वर येत शिक्षणाविषयी मंथन करत धोरणात्मक बाबीवर सडेतोड एकमुखी भूमिका घेतील अन सरकारी शाळा समृद्ध व्हाव्यात यासाठी प्रसंगी कटू पण सत्य मांडतील.सर्वाना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा व 23/10 लवकर रद्द व्हावा.यासाठी नुसते पत्रकावर विषय न घेता ते विषय तडीस लावन्यासाठी झटतील.आपला प्रश्न असेल तरच आंदोलनाला हजर,संघटनांच्या नेत्यांना फोन पण धोरणात्मक बाबीवर व शिक्षणाच्या मुद्यावर आपलं मौन सोडत.खऱ्या अर्थाने या संक्रातीच्या निमित्ताने फक्त गोड बोलून नाही तर ज्या बोलण्यातून गोड परिणाम होईल असे गोड बोलावे ह्याच माझ्याकडून व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली टीम कडून शुभेच्छा..तिळगुळ घ्या गोड बोला....*
आपला
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली*
9420453475
No comments:
Post a Comment