Tuesday, 27 February 2018

Ccrt प्रशिक्षण उदयपूर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेले नृत्य


CCRT प्रशिक्षण उदयपूर येथे आज मराठी भाषा दिनादिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वतीने सांगली टीमने काठीने घोंगडे घेऊद्या की रे...गीत   रमेश मगदूम,आकाश जाधव,अमोल शिंदे,मिलन नागणे,राजकुमार भोसले,अनिल मोहिते यांनी सादर केले.
 https://youtu.be/uJZQdGpzRRo

Thursday, 22 February 2018

*महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात?पण राजस्थानातील नाही???

*महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात?पण राजस्थानातील नाही???
*मार्बलच्या कारखान्यास भेटीतुन जाणवलेली राजस्थानी माणसाची सकारात्मकता...*

राजस्थानातील उद्योगप्रिय लोकांनी पाणी नाही,वाळवंट आहे,कसदार जमिनी नाहीत म्हणून नकारात्मक विचार करत आपल्या न्यूनतेला मोठे करत बसण्यापेक्षा आपल्या जमेच्या बाजूना सक्षम करत जीवनमान उंचावल्याचे लक्षात येते. ज्या मारवाडात वाळवंट आहे तेथील मारवाडी लोक आज देशभरात उद्योग व्यवसायात आघाडीत असून अत्यन्त विपरीत परिस्थिती असतानाही आर्थिक दृष्ट्या सक्षम असून अत्यन्त विश्वासाहार्य व्यावसायिक लोक म्हणून आपली ओळख निर्माण केली.आज आईस्क्रीम असो की हार्डवेअर दुकान,कलाकुसर या सर्व बाबतीत या लोकांनी मिळवलेल्या व्यावसायिक प्राविण्यातून बाजारपेठ आत्मसात केली.आज शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात पण राजस्थानात इतकी विपरीत परिस्थिती असताना शेतकरी आत्महत्या झाल्याच दिसत नाही.

राजस्थान म्हणजे वाळवंट.एवढेच मनावर बिंबले होते.पण एका बाजूला वाळवंट अन दुसरीकडे अत्यन्त आकर्षक दगडांचे डोंगर ही आहेत.जोधपूर मधील जोधपूरी दगड अत्यन्त आकर्षक असून सर्व महाल व घरे याच दगडाने बांधली आहेत.या दगडांची घडवणं अत्यन्त सुरेख असून घराला ही महाल बनवणारा दगड तेथील डोंगरात मुबलक मिळतो.

आपल्याकडे मार्बल पाहिल्यावर तो दगड कुठे असेल व त्यापासून फरशी कशी बनवतात असे वाटायचे.अन आपल्या कडील कठीण काळा दगड पाहिल्यावर जमिनीतून इतका पांढरा शुभ्र दगड निघत असेल??असा प्रश्न पडायचा.राजसमंद जिल्ह्यात मार्बल चे डोंगर आहेत.जोधपूर हुन नाथद्वारा कडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा मार्बलचे कारखाने दिसले.एका कारखान्याला भेट देऊन तेथील माहिती घेतली. तेथे जवळच्या डोंगरातून कापून आणलेले मोठे आयताकृती दगड कटिंग करून त्यापासून विविध आकारात फरशी बनवण्यासाठी दगड मशिनला लावले होते.एका मशीनवर दिवसात दोन दगड कटिंग होतात असे मॅनेजरनी सांगितले.ऑस्ट्रेलिया मधूनही तेथील दगड येथे आला होता व त्याचे कटिंग ही सुरू होते.फक्त आपल्या स्थानिक डोंगरात मिळतो तेच मार्बल तयार करून न पाठवता परदेशातून ही दगड आणून ते मार्बल ही उपलब्ध करणे हे या लोकांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाची जाणीव करून देते.खाणीत दगड काढणारे,ते कटिंग करणारे,गाड्याभरणारे,त्या गाड्या रिकाम्या करणारे तसेच महाराष्ट्रात हे मार्बल विकणारे दुकानदार अन घरात हे मार्बल बसवनारे गंवडी ही राजस्थानी लोकच बहुसंख्येने आढळतात.आपल्याकडील हार्डवेअर दुकाने पाहिली तरी लक्षात येईल मोठी उलाढाल असणाऱ्या राजस्थानी व्यक्तीच्या दुकानात फक्त 2 ते 3 लोक काम करतात.ते राजस्थानी असतात.जेव्हा एखादी गाडी भरायची असते व कामगार कमी असतो त्यावेळी कामगारांची वाट न पाहता स्वतः लोखंडी अँगल उचलून दुकानाचे मालक गाडीत भरतात.पण आपण आपण मालक झालोत की मी फक्त खुर्चीवर बसणार इतर कामे कामगारांनी करायची ही मानसिकता बऱ्याच लोकांत दिसते पण राजस्थानी लोक याबाबतीत अपवाद दिसतात.

*उत्पादन ते होलसेल,रिटेल विक्री अशी या लोकांनी निर्माण केलेली साखळी खूपच मार्गदर्षक आहे.सध्या भारतात उपभोग वृत्ती वाढलेली आहे.भारतात सेवा क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असताना आपल्या बाजारपेठेचा वापर चीन सारखे देश करत आहेत.भारत हा युवकांचा देश,हे युवक निर्माते बनले तर भारत जगात आघाडीवर असेल पण हे युवक फक्त ग्राहक व नोकरदार बनणे नक्कीच देशाला पिछाडीवर नेणारे होईल.राजस्थानी लोकांनी निर्माण केलेली साखळी सर्वत्र निर्माण झाली



तर नक्कीच नोकरी पेक्षा व्यवसाय,उद्योगात आपण पुढे जाऊ.महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड कष्टाळू आहेत.काळ्या मातीतून ते सोने पिकवतात पण पिकवल्यांनंतर पुढे ते विकण्याची शेतकऱ्याची स्वतःची साखळी मात्र दुर्दैवाने निर्माण करण्यात अपयश आले किंवा ती बनवण्याकडे महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी तितके लक्ष दिले नाही.सहकारातून काही अंशी तो प्रयत्न झाला पण सहकारावर वैयक्तिक प्रभुत्व निर्माण करत स्वतःची जहागिरी निर्माण करण्याच्या हव्यासात शेतकऱ्याचा बळी गेला.अन आज शेतकरी आत्महत्येमागे सर्वात मोठे कारण उत्पादन कमी हे नाही तर आलेल्या उत्पादनास, उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव न मिळणे हे असून जर राजस्थान प्रमाणे उत्पादन ते विक्री ही साखळी निर्माण झाल्यास ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी संपन्न व स्वयंभू होईल.पण हे व्हावे अशी प्रबळ इच्छा राज्यकर्त्यांची आहे का???*

अमोल शिंदे
amol.mallewadi@gmail.com
9420453475
http://amolshindemrjphs.blogspot.in/?m=1

Monday, 19 February 2018

*शिवजयंती महाराणा प्रतापांच्या मेवाड भूमीत*

*शिवजयंती महाराणा प्रतापांच्या मेवाड भूमीत*

हिंदवी स्वराज्य संस्थापक,रयतेच्या राजांस विनम्र अभिवादन,जय शिवाजी,जय भवानी

राजे अनेक झाले पण रयतेच्या सुखासाठी झटणारे काही मोजकेच राजे झाले,त्यातही परकीयांची गुलामी झुगा
रून रयतेच्या स्वराज्यासाठी बलशाली परकीय सत्ताधिशांसोबत लढण्याचे सामर्थ्य दाखवणारे व मावळ्यांच्यात स्वराज्याची भावना निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापणा करणारे, मराठी माणसाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष,शिवाजी महाराजांची जयंती स्वराज्यासाठी लढणारे दुसरे राजे महाराणा प्रतापांच्या मेवाड राज्याची राजधानी उदयपूर (राजस्थान) येथे सर्व भारतातून CCRT प्रशिक्षणास आलेल्या देशभरातील शिक्षकांनी उत्साहात साजरी करून Our Cultural Diversity या प्रशिक्षणाच्या विषयाची पहिल्या दिवशीच सुरवात महाराजांच्या जयजयकारांच्या घोषणांनी झाली.त्याचा भाग असणे हा एक आम्हासर्वासाठी अविस्मरणीय क्षण.

छत्रपतींचे नाव घेतले की देशभरातील लोकांच्या डोळ्यात एक आदरयुक्त भाव दिसतो, आज उदयपूर मध्ये छत्रपतींच्या जयजयकारांच्या घोषणा देताना अभिमान तर होताच पण मराठी भूमीत शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला येणे हे भाग्य लाभल्याची जाणीव होते.

गेली चार दिवस राजस्थान मधील जयपूर, अजमेर,पुष्कर,जोधपूर पहाताना येथील शिवकालीन राजे जयपूरचे मिर्झा राजे जयसिंग,जोधपूरचे जसवन्तसिंह राठोड यांचे राजवाडे,किल्ले आजही अत्यन्त दिमाखात उभे आहेत.तेथे कुठेच मोडतोड झाली नाही.त्या राजांचे वैभव आजही जाणवते.खूपच चैन विलासात या राजांनी आपले जीवन जगल्याची अनेक प्रतीके येथे दिसतात.अन मनात एक प्रश्न पडला शिवकालीन हे सर्व राजे पण यांच्या सर्व बाबी अत्यन्त सुस्थितीत पण महाराष्ट्रातील किल्ले गड तितके सुस्थितीत नाहीत त्यांची पडझड इतकी कशी झाली? राजानी आपले वैभव स्वतःचे गड,राजमाल यांच्या भव्यतेला मानले नाही तर येथील रयतेच्या झोपडीत आंनदाची लकेर निर्माण होऊन समतेने जगता यावे यासाठी अखंड आयुष्य सन्ह्याद्रीच्या कड्यापकारीत जुलमी राजवटी सोबत  संघर्ष करण्यात वेचले.या संघर्षात मुघल व परकीयांनी वेळोवेळी लोककल्याणकारी स्वराज्यात हैदोस करत येथील गड,किल्ले,मंदिरे यांची मोडतोड केली.पण जयपूर व जोधपूरचे राजे पराक्रमी व वैभव संपन्न होते पण ते मुघलांच्या आधीन झाले व त्यांनी आपल्या दौलती वाचवल्या.मिर्जा राजे जयसिंग तर औरंगजेबचा सेनापती व जोधपूरचे जसवन्तसिंह राठोड सरदार होते.आग्रा भेटीत जसवन्तसिंह राजांच्या पुढल्या रांगेत का होता?याचे कारण पराक्रम नव्हता तर त्यांची मुघलांसोबत असणारी वफादारी..पण जेव्हा हाल्दीघाटी व चित्तोडगड मध्ये गेलो त्यावेळी तेथील अनेक बाबी भग्न स्वरूपात जाणवल्या अन जे राजे परकीयांच्या अंकित झाले नाहीत व रयतेच्या भल्यासाठी उभे राहिले त्यांच्या राज्यातील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड संघर्षात झाली.चित्तोडगड हा अशाच स्वाभिमानी संघर्षाची प्रचिती देणारा गड,राणी पद्मिनी सोबत हजारो स्त्रियांनी केलेला जोहर असो की महाराणा प्रताप ज्यांनी 21 वर्षे कोणताही थाटमाट न करता पानावर भोजन घेतले व जमिनीवर विश्रांती घेतली,आयुष्यभर मुघलांसोबत गनिमी काव्याने संघर्ष केला.दुर्दैव हेच की एकीकडे महाराणा प्रताप स्वराज्य स्वाभिमानासाठी लढत असताना इतर राजे मात्र मुघलांना सामील होऊन स्वतः ऐशोअरामात राहिले. *जोधपूर,जयपूर पहाताना स्थापत्य कला,महालांची भव्यता आवडली पण इतिहास ऐकताना रयतेसाठी संघर्ष जाणवत नव्हता पण हाल्दीघाटी, चित्तोडगड पहाताना तेथील राजांचा पराक्रम,शौर्य स्वातंत्र्यप्रियता प्रेरणा देणारे होते.छत्रपती शिवाजी महाराजानी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य व मेवाडचे राज्य यांच्यात साम्य जाणवले,आज याच मेवाड मध्ये छत्रपतींची जयंती सर्वानी मोठ्या उत्साहाने साजरी केली.*

*यावेळी सांगलीतून उपक्रमशील शिक्षक राजकुमार भोसले, मिलन नागणे,रमेश मगदूम,अनिल मोहिते व आकाश जाधव यांच्या सोबतीने इतिहासाच्या पाउलखुणा पाहत आपली सांस्कृतिक विविधता या विषयाचे देशभरातील शिक्षकांसोबतच्या प्रशिक्षणाची सुरवात उत्साहात झाली...*

CCRT प्रशिक्षणाच्या निमित्ताने देशभरातील शिक्षकांशी हितगुज करण्याची व त्यांच्या शिक्षण पद्धती,कला,संस्कृती यांची माहिती जाणून घेता येणार आहे.

✒✒ *अमोल शिंदे* ✒✒
*जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग,ता.मिरज जि. सांगली*

9420453475

Friday, 2 February 2018

5 लाख 70 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा पगार करणारी शालार्थ प्रणाली असून अडचण नसून खोळंबा

*शालार्थ पगार बिले ऑनलाईन पगार ऑफलाईनच*

*5 लाख 70 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा पगार करणारी शालार्थ प्रणाली असून अडचण नसून खोळंबा


*

जानेवारीचा पगार ऑफलाईन होणार म्हणे पण यापूर्वी गेली चार वर्षे सुरू असणाऱ्या शालार्थ प्रणालीने ऑनलाईन पगार झाले काय???

जानेवारीचा पगार ऑफलाईन करण्यासाठी नुकतेच एक शासन पत्र आले आहे.5 लाख 70 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा पगार करणारी शालार्थ प्रणाली असून अडचण नसून खोळंबा ठरली आहे.12 जानेवारी पासून तांत्रिक कारणाने ही प्रणाली बंद पडली असून यापूर्वी ही प्रणाली सुरळीत असतानाही ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने पगार बिल शिक्षकांना करावे लागत आहे.दुहेरी पगार पत्रके करूनही आज अखेर शिक्षकांच्या खात्यावर थेट ऑनलाईन पगार जमा झाला नाही.त्यामुळे
शालार्थ प्रणाली मुळे शिक्षकांचे पगार सुरळीत होण्यापेक्षा त्यात अडथळाच बनत असून एकतर या प्रणालीत आवश्यक बदल करून थेट शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होण्याची व्यवस्था करावी.अन्यथा ही प्रणाली बंद करून या प्रणालीच्या अपयशाची कारणे शोधून संबंधीत सॉफ्टवेअर निर्माते व नियंत्रकांना जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी.

शालार्थ प्रणाली मध्ये आवश्यक बदल-
*1.शालार्थ प्रणालीत बदल करून पगार एकाच पद्धतीने ऑनलाइन व्हावेत वद्विशिक्षकी शाळांत पात्र मुख्याध्यापक नसल्याने ddo 1 द्विशिक्षकी शाळेतील शिक्षकांना करू नये*

2.शालार्थ मधून पगार बिल तयार करण्यासाठी शिक्षकांना महिन्याला पैसे खर्च करायला लागू नयेत.यासाठी तरतूद केंद्रस्तरावर सक्षम अधिकारी यांची ddo1 म्हणून निश्चिती करावी.

3.शालार्थ मध्ये पगार बिल तयार होताना ddo 1 मुख्याध्यापक,ddo 2 beo, ddo3 Eo आहेत पण पगार वर्ग होताना मात्र cafo-Eo-Bdo-केंद्र प्रमुख-शिक्षक असा प्रवास होत असल्याने आजही ऑनलाइन व ऑफलाईन दुहेरी पगारपत्रके केली जातात.जिल्ह्यातून पगार सोडल्यास थेट शिक्षकांच्या खात्यात जमा झाल्यास कमी कालावधीत पगार होईल.यासाठी शालार्थ सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे पण याबाबत आवश्यक सुधारणा झाल्या नसल्याने डबल काम करावे लागत आहे. या शालार्थ प्रणालीत वरील आवश्यक बदल संबंधीत अधिकारी व सॉफ्टवेअर नियंत्रकानी करणे गरजेचे आहे.

*सदर बदल का होत नसावेत व शिक्षक संघटनाही गप्प का??*
*एकीकडे सेवार्थ प्रणाली व्यवस्थित सुरू असताना शालार्थ बाबत डोळेझाक का केली जात आहे.*

1.शालार्थ प्रणालीने 100 टक्के ऑनलाईन पगार झाल्यास शिक्षकांचे पगार त्यांनी दिलेल्या कोणत्याही बँकेच्या खात्यावर होतील त्यामुळे ठराविक बँकेत पगार होणार नाहीत.

2.ही प्रणाली अस्तित्वात आल्यावर शिक्षक बँका,पतसंस्था यांच्या वजावटी थेट होणार नाहीत.त्यामुळे या संस्था अडचणीत येतील व वसुलीसाठी अधिक त्रास घ्यावा लागेल म्हणून शिक्षक संघटनाचे सोयीस्कर दुर्लक्ष.

अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली*

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...